यवतमाळ : येथील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते, प्रशिक्षक, चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष शर्मा यांच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच पद्मश्री हा सन्मान प्राप्त झाला आहे.
सुभाष शर्मा हे गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. देशभरात हजारो शेतकरी त्यांच्या प्रेरणेने विषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत. यवतमाळ जवळच्या तिवसा येथील त्यांची २० एकर शेती एक प्रकारे नैसर्गिक शेतीची प्रयोगशाळाच आहे. या शेतीमध्ये त्यांनी रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांच्या शेतात आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी भेटी देऊन प्रशिक्षण घेतले आहे. सुभाष शर्मा यांची भारतातील अनेक कृषी विद्यापीठांमध्ये व्याख्याने देखील झाली आहेत.
यवतमाळ : येथील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते, प्रशिक्षक, चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष शर्मा यांच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच पद्मश्री हा सन्मान प्राप्त झाला आहे.
सुभाष शर्मा हे गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. देशभरात हजारो शेतकरी त्यांच्या प्रेरणेने विषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत. यवतमाळ जवळच्या तिवसा येथील त्यांची २० एकर शेती एक प्रकारे नैसर्गिक शेतीची प्रयोगशाळाच आहे. या शेतीमध्ये त्यांनी रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांच्या शेतात आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी भेटी देऊन प्रशिक्षण घेतले आहे. सुभाष शर्मा यांची भारतातील अनेक कृषी विद्यापीठांमध्ये व्याख्याने देखील झाली आहेत.