IND vs ENG Suryakumar Yadav told the reason for the defeat : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते, मात्र तिसऱ्या सामन्यात यजमानांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. एकेकाळी भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण ते शक्य झाले नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याचा टर्निंग पॉइंट काय होता हे सांगितले आहे. कर्णधार सूर्याने अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांच्या विकेट्सचे वर्णन टर्निंग पॉइंट म्हणून केले आणि सांगितले की जोपर्यंत हे दोन फलंदाज क्रीजवर होते, तोपर्यंत आम्ही सामन्यात होतो.
सूर्यकुमार यादवने सांगितले पराभवाचे कारण –
सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटले की नंतर थोडे दव पडेल. मला वाटतं जेव्हा हार्दिक आणि अक्षर फलंदाजी करत होते, तेव्हा सामना आमच्या हातात होता. याचे श्रेय आदिल रशीदला जाते, त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्यांनी आम्हाला स्ट्राईक रोटेट करु दिली नाही. त्यामुळेच आमच्या संघात अनेक फिरकीपटू होते.” भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा समावेश होता.