सूरज बडजात्या दिग्दर्शित विवाह हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी शाहिद कपूर(Shahid Kapoor) व अमृता राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने धूमाकूळ घातला होता. हृदयस्पर्शी कथा आणि कलाकारांचा अफलातून अभिनय, यामुळे या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळताना दिसते. आता शाहिद कपूरने एका मुलाखतीत विवाह चित्रपटावेळी त्याने सूरज बडजात्या यांना त्याला चित्रपटातून काढून टाकावे अशी विनंती केली होती, अशी आठवण सांगितली आहे. याबरोबरच, त्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया काय होती, शाहिदने असे म्हणण्यापाठीमागे नेमके काय कारण होते? याचादेखील अभिनेत्याने खुलासा केला आहे.
Home Uncategorized “माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा...