
वरूड: २८ ऑगस्ट रोजी स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय, वरूड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला येथील ‘सायबर वॉरियर्स’ साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबद्दल मार्गदर्शन केले.आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच अनुषंगाने, कार्यशाळेत व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, एटीएम आणि ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे दुष्परिणाम, तसेच बनावट (फेक) संकेतस्थळांद्वारे होणारी फसवणूक यांसारख्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, आणि केवळ सुरक्षित संकेतस्थळांना (सिक्युरिटी सर्टिफिकेट असलेल्या) भेट देण्यासारख्या महत्त्वाच्या टिप्सही विद्यार्थांना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही वक्त्यांनी केले.या कार्यशाळेचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्यांच्या परवानगीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिक्षक भालतीलक सर, राऊत सर, पाटकर सर, पाटील सर, विद्या घुळे मॅडम, बाळापुरे सर, वानखडे सर, बिहाडे मॅडम आणि बानेरकर सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू आणि समन्वयक डॉ. दीप्ती पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली, क्विक हिल फाउंडेशन (पुणे) आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला.