मुर्तीजापुर नाफेड केंद्रावर ‘वशिलेबाजी’चा आरोप; नियमात बसणारे सोयाबीन नाकारल्याने शेतकरी आक्रमक

0
14

प्रशासनाकडून आरोप फेटाळले; पारदर्शकतेचा दावा, मात्र शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

मुर्तीजापुर (विलास सावळे, कार्यकारी संपादक, ज्वालादीप)

केंद्रावर माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मते, त्यांनी स्वच्छ, कोरडा आणि शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार सोयाबीन आणले आहे. मात्र, केंद्रावरील कर्मचारी कधी ओलाव्याचे (Moisture) तर कधी गुणवत्तेचे कारण पुढे करून माल नाकारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या शेतकऱ्यांची ‘ओळख’ आहे किंवा जे ‘विशिष्ट’ गटातील आहेत, त्यांचा तसाच माल मात्र विनासायास स्वीकारला जात असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

मुर्तीजापुर येथील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर सध्या सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. खरेदी प्रक्रियेत ‘तोंड पाहून’ म्हणजेच वशिलेबाजीने माल घेतला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाच्या नियमावलीनुसार दर्जेदार माल आणूनही तो नाकारला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शेतकऱ्यांचे नेमके आरोप काय?

या पक्षपातीपणामुळे सामान्य शेतकऱ्यांना दिवसभर केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. माल न विकला गेल्याने वाहतुकीचा खर्च, मजुरी आणि वेळ वाया जात असून शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.नाफेड प्रशासनाचा बचावदुसरीकडे, नाफेडच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रशासनानुसार: खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन नोंदणी आणि टोकन प्रणालीनुसार सुरू आहे. * केवळ तांत्रिक निकष आणि ओलावा मोजणीत पात्र ठरणारेच सोयाबीन स्वीकारले जात आहे. * निकष पूर्ण न करणाऱ्या मालाची खरेदी करणे नियमात बसत नाही.तणावाचे वातावरण आणि मागणीया परस्परविरोधी दाव्यांमुळे खरेदी केंद्रावर सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष केंद्रावर येऊन तपासणी करावी आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देऊन वशिलेबाजी थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here