Anjali Damania : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट लिहिली असून आपण लवकरच अजित पवार यांना भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे……
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप झाल्याने आधीच अस्थिर असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळेही या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. लोकप्रतिनिधीने जनहितार्थ काम करणे अपेक्षित आहे.
म्हणूनच धनंजय मुंडे यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निवडणूक आयोगानेही चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यापासून दूर ठेवणे गरजेचं आहे अशी मागणी अंजली दमानियांनी केली होती. आता अंजली दमानियांनी एक पोस्ट करुन अजित पवारांकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे……